जिल्ह्यचे लक्ष वेधलेल्या त्या संशयितांचे अहवाल पाॅझीटीव्ह

माजलगाव, धारुर तालुक्यात दहशत

तेलगाव, दि.२१ (प्रतिनिधी) माजलगाव तालुक्यातील ४३ संशयितांचे काल दि.२० मे रोजी स्वॅब घेऊन ते लातुर येथील तपासणी लॅबला पाठवले होते. त्यापैकी कांहीचा अहवाल काल रात्री आला होता. त्यातील कांहींचे अहवाल येणे बाकी होते ते आज गुरूवारी दुपारी आले असुन यात माजलगावचे १३ संशयितांचे अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने हा माजलगावकरांसाठी मोठा धक्का असुन, यात धारूर तालुक्यातील कुंडी येथील एक जणाचा समावेश असल्याचे समजते. तेलगाव पासून जवळच असल्याने गेली दोन दिवस तेलगावात दहशतीचे वातावरण आहे.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, पुणे मुंबई वरून आलेल्या कांही माजलगाव व धारूर तालुक्यातील कांही संशियतांचे बुधवारी स्वॅब घेऊन ते लातुर येथील विलासराव देशमुख तपासणी लॅबला पाठवले होते. यातील कांही स्वॅबचे निगेटीव्ह अहवाल बुधवारी रात्री आरोग्य विभागास प्राप्त झाले होते. तर १३ जणांचे अहवाल प्रलंबित होते. ते अहवाल कधी येणार, कसे येणार याच विचारात माजलगाव धारूर तालुक्यातील नागरिक होते. जो तो अहवाल आले का हाच प्रश्न एकमेकांना विचारत होते. त्यातच दुपारी त्या प्रलंबित असलेल्यांचे अहवाल माजलगाव आरोग्य विभागास प्राप्त झाल्याचे खाञीलायक वृत्त असुन, ते प्रलंबित असलेले १३ अहवाल पाॅझीटीव्ह आले असल्याचे समजते. यामुळे माजलगाव धारूर तालुक्यातील नागरिकांना धक्का बसला आहे. यामध्ये निञुड  येथील ७, नाकलगाव येथील १ तर कुंडी ता धारूर येथील ५ जणांचा समावेश असुन, या वृत्ताला वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेश साबळे यांनी दुजोरा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!