शालेय विद्यार्थी असलेली खाजगी बस दरीत कोसळली ; 16 जणांचा मृत्यू .

कुल्लू दि.4 जुलै – शालेय विद्यार्थी असलेली खाजगी बस दरीत कोसळली असून यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) हा अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरील अवघड वळणावरुन दरीत कोसळली, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ( A private bus carrying schoolchildren crashed into a ravine; 16 killed. )
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधून 45 ते 46 जण प्रवास करत होते. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य तात्काळ सुरू झाले. जंगला नावाच्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. बस अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे दोन पथक अपघातस्थळी दाखल झाल्याची माहिती कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी दिली.
कुल्लू जिल्ह्यातील शैनशारमध्ये खाजगी बस जंगला गावापासून जवळपास 200 मीटर अंतरावर रस्त्यावरुन दरीत कोसळली. दुर्घटनेत 16 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. तसेच, या प्रवाशांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचाव कार्य सुरु करत तीन जणांना बाहेर काढण्यात आलं असून ते गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जात आहे. जखमींमध्ये बसच्या चालकाशिवाय प्रवाशांचा समावेश आहे. शाळकरी मुलं शाळेतून घरी परतत होती, त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
बस रस्त्यावरुन तब्बल 200 मीटरपर्यंत खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी घडली. बस शैनशारहून औटच्या दिशेनं जात होती. कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितलं की, बस अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांना बाहेर काढण्यात यश झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस ज्या दरीत कोसळली ते ठिकाण अत्यंत दुर्गम क्षेत्र आहे. त्यामुळे बस दरीत कोसळल्याने बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करत या दुःखद प्रसंगी मी तुमच्यासोबत आहे, असं मोदी म्हणाले. तसेच, या अपघातात जीव गमावणाऱ्या प्रवाशांसाठी पंतप्रधानांनी 2 लाखांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.