आजपासून महाराष्ट्रात अनलॉक; महाविद्यालयेही सुरु… पहा काय आहेत नवे बदल.

मुंबई दि.1 फेब्रुवारी – राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधात आजपासून सुट देण्यात येत असून तसे आदेश शासनाने काढले आहेत. कोविड नियमावली (Covid guidelines) अंतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध (restrictions) लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता 50 टक्के उपस्थितीत सुरू करता येतील.
(Unlock in Maharashtra from today; Colleges also started … see what the new changes are.)
स्थानिक परिस्थिती लक्षात घेता रात्रीच्या संचारबंदीबद्दलचे (night curfew) नियमही शिथिल करण्याचे अधिकार तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी आता 200 जणांना निमंत्रण देता येणार आहे.
राज्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर ठाकरे सरकारने 10 जानेवारीपासून निर्बंध जारी केले होते. आता मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट (Third wave) आता उतरणीला लागली असून सोमवारी शहरात एक हजाराहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून झपाट्याने कमी झाली. आठ दिवसांपूर्वी 93 हजार 642 वर पोचलेली ही संख्या सोमवारी साठ हजारांच्या आत आली आहे. राज्यातील अन्य शहरांमध्येही हेच चित्र आहे.
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा निर्बंध शिथिल केले आहेत. 1 फेब्रुवारी 2022 पासून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश लागू होणार आहेत. राज्यातील राष्ट्रीय उद्याने, सफारी नियमित वेळेनुसार सुरू होणार असून ज्या पर्यटनस्थळांवर तिकीट आहे ती देखील सुरू होणार आहेत. लसीचे (vaccine) दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
सुधारित आदेशातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे… (Maharashtra reopen)
1. मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर आणि चंद्रपूर या 11 जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश. 18 वर्षांवरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस आणि 70 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे.
2. कोरोनाची स्थिती पाहून दर आठवड्याला ही यादी अपडेट केली जाईल. या यादीचे निकषही परिस्थितीनुसार बदलले जातील.
3. अ वर्गातील जिल्ह्यांना काय दिलासा –
> समुद्रकिनारे, उद्याने आणि पार्क हे स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील.
> जलतरणतलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू होणार
महाविद्यालय आजपासून सुरु, प्रात्याक्षिक परीक्षा ऑफलाईन
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांनी जाहीर केल्याप्रमाणं आज राज्यातील महाविद्यालय (College) आणि विद्यापीठं पुन्हा सुरु होणार आहेत. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण देणारी महाविद्यालय आणि विद्यापीठं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत आजपासून सुरु होत आहेत.
राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संबंधित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतने यामधील नियमित वर्ग आज 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी चर्चा करून विद्यापीठ-महाविद्यालये सुरु करण्यात येतील. कोविड लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल, तर इतरांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्रात्याक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालय आजपासून सुरु होणार आहे. पुणे,अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू होणार आहे. आजपासून विद्यापीठात कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार आहे. यासंदर्भात फर्ग्युसन महाविद्यालयानं परिपत्रक काढलं आहे. महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीत सुरु होणार आहेत.