कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची झाली वर्षपूर्ती; मंगळवारची राज्यातील आकडेवारी… उन्हाळ्यातही राहणार तीव्रता…

मुंबई दि.10 मार्च- देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले. राज्यातील मंगळवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांची (Corona Positive) आकडेवारी पाहिली तर राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असून उन्हाळ्यातही कोरोना संसर्गाची तीव्रता राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
(Corona’s first patient was found a year ago; Tuesday’s state statistics … Intensity will continue even in summer …)
दि.9 मार्च 2020 रोजी देशातील पहिले कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण पुण्यात आढळून येण्याच्या घटनेस बरोबर एक वर्ष उलटले आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाने हाहाकार माजवला होता. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे दिसत असताना आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरुपाचे निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर करण्यात येत आहे. महाराष्ट्रात दररोज आढळून येणारी रुग्ण संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांत 9 हजार 927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 हजार 182 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण 95 हजार 322 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.34 टक्कांवर पोहोचलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
उन्हाळ्यात (summer) कोरोनाचा संसर्गाची तीव्रता…
कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारसी कोरोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत.
उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस काटेकोरपणे नियंत्रण केले नाही तर पुन्हा सप्टेंबर २०२० प्रमाणे स्थिती उद्भवू शकेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांवर जोमाने भर देणे आवश्यक असल्याचे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.