शेती विषयक

436 मृत्यू तर 22 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन उद्ध्वस्त; मराठवाड्यातील हाहाकार.

मुंबई दि.30 सप्टेंबर – राज्यात गुलाब चक्रीवादळाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसला आहे. गुलाब चक्रीवादळाचे (cyclone) रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे (heavy rains) शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे. सोयाबीन, ऊस, कापुस आणि अन्य खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

(436 deaths while more than 22 lakh hectares of land destroyed; Hahakar in Marathwada.)

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Veddetiwar) यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत मराठवाड्यातील नुकसानीची माहिती दिली. मराठवाड्यात जवळपास 22 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन पावसामुळं उद्ध्वस्त झाली आहे. या अतिवृष्टीमध्ये 436 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 नागरिकांना वीज पडल्यानं मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पावसानं राज्यातील शेती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यासह 10 पैकी 7 जिल्ह्यांत 180 टक्के पाऊस झाला आहे. 436 मृत्यूंमध्ये 6 जणांचे मृतदेह (Dead Body) अद्याप सापडले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली.

दरम्यान, राज्याने आतापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळाची मदत अद्याप मिळालेली नाही. तसेच मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून मला सांगण्यात आलं आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह विविध पक्ष संघटनाकडून ओला दुष्काळ जाहिर करुन तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!