महाराष्ट्रात शिक्षण सेवकांची मेगा भरती; 6 हजार 100 जागा.

मुंबई दि.9 जुलै – राज्यात तब्बल 6 हजार 100 शिक्षण सेवकांची आता लवकरच भरती (recruitment) होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून शिक्षण सेवकांची भरती वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता शिक्षण सेवकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
(Mega recruitment of education workers in Maharashtra; 6 thousand 100 seats.)
शिक्षण सेवकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जाणार
राज्यात एमपीएससी तसेच इतर पदभरतीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी आयोगामार्फत संबंधित सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागासुद्धा भरल्या जाव्यात या मागणीने जोर धरला.
याच पार्श्वभमीवर राज्य सरकारने प्रलंबित असलेल्या राज्यातील तब्बल 6 हजार 100 शिक्षण सेवकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत आता स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जाणार आहेत.
प्रक्रिया पूर्ण करण्याचा शिक्षण आयुक्तांना निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार मागील कित्येक दिवसांपासून शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा प्रश्न प्रलंबित होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांनी शिक्षण सेवकांच्या भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानंतर आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत.
कोविड-19 (Covid-19) या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर बंदी घातली होती. मात्र, गेल्यावर्षाच्या अखेरीस राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली होती.
त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही भरती लवकरच पूर्ण होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे सुमारे 6100 पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.