दुचाकी व कारच्या अपघातात एक जण ठार; धारुर तालुक्यातील घटना.
हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.

किल्लेधारूर दि.16 जून – भरधाव येणाऱ्या कारने एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना तेलगाव येथील शिवाजी चौकात मंगळवारी रात्री घडली.
(One killed in two-wheeler and car accident; Incidents in Dharur taluka.)
यासंदर्भात माहिती अशी की, तेलगाव येथील शिवाजी चौकात असलेल्या श्री हनुमान मंदिरात मारूती श्रीकिसन साबळे हे पुजारी म्हणुन काम करतात. ते जवळच असलेल्या भोपा ता.धारूर येथे राहतात. सध्या लाॅकडाऊन (lockdown) असल्याने मंदिर बंद आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी मारूती साबळे मंदिरात दिवाबत्ती करण्यासाठी आले होते.
यावेळी माजलगाव रोडने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने मारूती साबळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) साबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ माजलगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु त्यांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रूग्णालयात हलवण्यात आले.
माञ येथे उपचार चालु असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे शवविच्छेदन करून भोपा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारूती साबळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
शिवाजी चौकात आस्तव्यस्त वाहने थांबत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले
तेलगाव येथील शिवाजी चौकात पोलीसांच्या (Police) दुर्लक्षाने चारही रोडवर ऐन चौकालगतच आस्तव्यस्तपणे वाहनधारक आपली वाहने लावत आहेत. त्यातच अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या जीप तर भर रस्त्यात उभ्या करून प्रवाशी भरतात. अशा या आस्तव्यस्त वाहतुक व्यवस्थेमुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले. त्यातच मंगळवारी राञी हा अपघात होऊन यात एका व्यक्तीचा नाहक बळी गेला. जर दिंद्रुड पोलीसांनी (Police) येथील चौकालगत उभी राहणारी वाहने थांबु दिली नाही तर किमान आगामी काळात असे अपघात होणार नाहीत.