15 सप्टेंबरपासून वाढणार कोरोना संसर्ग; तर लागणार कडक लॉकडाऊन.

मुंबई दि.2 सप्टेंबर – सध्या जगभर कोरोना (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरपणे चर्चा सुरू असताना आपणही दुर्लक्ष करता कामा नये. प्रसंगी खंबीर पावले उचलत वेळ पडली तर पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल दि.1 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत दिला. दरम्यान टास्क फोर्सने 15 सप्टेंबर नंतर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली.
(Corona infection to increase from 15 September; So it will take a strict lockdown.)
मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या (Third Wave) लाटेबाबत चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील कोविड संदर्भात मंत्रिमंडळाला माहिती दिली. राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचाही यावेळी आढावा घेण्यात आला. टास्क फोर्सने (Task Force) केलेल्या सूचनांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली.
जागतिक पातळीवर कोरोना संसर्गाची (Corona Infection) तिसरी लाट (Third wave) येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. भारतात केरळमध्ये मागील आठवडाभरात रुग्णसंख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पुढील दीड ते दोन महिने महत्त्वाचे असल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तो लावावेच लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सण साजरे होणार आहेत. यावेळी लोक एकत्र आल्याने संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा साठ लाखांपर्यत जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सभा, मोर्चे, आंदोलने, यात्रा आदींवर प्रतिबंध (restrictions) लावण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला. येत्या १५ सप्टेंबरपासून कोरोना संसर्गाचे आकडे वाढू लागतील, असा टास्क फोर्सचा अंदाज आहे. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापसून कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, अशी शक्यता मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी व्यक्त केली.