महत्त्वाची बातमी … या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून वगळणार; सर्वांची पडताळणी केली जाणार.

(New Delhi, April 27: Important news has come out regarding the Prime Minister’s Kisan Sanman Nidhi Yojana. People who are ineligible for the scheme are also benefiting from the honorarium. Therefore, all the beneficiaries of this scheme will be verified and a social audit will be conducted between 1st May to 30th June.)
नवी दिल्ली दि.27 एप्रिल – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेसाठी अपात्र असलेले लोक देखील या सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाणार असून 1 मे ते 30 जून दरम्यान सोशल ऑडिट (Social Audit) करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व त्यातून त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) राबवण्यास सुरुवात केली. या योजनेतून जवळजवळ साडेबारा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होतो आहे. या योजनेचा आता अकरावा हफ्ता येणार आहे. सध्या या अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र एप्रिल ते जुलै दरम्यान अकरावा हप्ता खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.
अशातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेसाठी अपात्र असलेले लोकदेखील या सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary, Department of Agriculture) डॉ. देवेश चतुर्वेदी यांच्या निर्देशानुसार 1 मे ते 30 जून दरम्यान सोशल ऑडिट (Social Audit) करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र लोकांची माहिती गोळा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या यादीच्या साहाय्याने अपात्र असलेल्यांची नावे यादीमधून काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील.
तसेच एकाच घरातून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची नावे व मृत व्यक्तींची नावे या यादीतून वगळली जाणार असल्याचे समोर येत आहे. तसेच या प्रकल्पात सोशल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती (Six member committee) स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
( Important news … Prime Minister will exclude these farmers from Kisan Sanman Nidhi; All will be verified. )