Maharashtra Bhushan … 12 श्रीसदस्यांचा मृत्यू ; महाराष्ट्र भुषण सोहळ्यास गालबोट.

मुंबई दि.17 एप्रिल – मुंबई खारघरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भुषण Maharashtra Bhushan पुरस्कार सोहळ्यात 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हे उष्माघाताने ( heatstroke ) झाल्याचे सांगितलं जात असून मृत्यूचा आकडा लपवला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. ( Maharashtra Bhushan … 12 members died ; Cheek for Maharashtra Bhushan celebration. )
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाख लोकं गोळा करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला. मात्र लाखोंच्या संख्येत गर्दी करताना लोकांना लागणाऱ्या सुख सोयी दुर्लक्षीत राहिल्या. उष्माघातामुळे ( heatstroke ) 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी राज्य शासनावर टिका केली आहे. सोहळ्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी असून संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी केली आहे.
दरम्यान, एमजीएम रुग्णालयात 15 जणांवर उपचार सुरु असून त्यापैकी 2 जण गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ), विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ), मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी रुग्णालयात जावून उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. मृतांच्या कुटूंबियांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी जाहिर केली. दरम्यान राजभवनात होणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा राजभवनात न करता खुल्या मैदानात का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी राजभवनात कार्यक्रम केला असता तरा सदर प्रश्नच उभा झाला नसता अशी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) व अंबादास दानवे यांनी मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप केला. दरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रकरणात दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे कळते.