ओमायक्रॉन संकट… कडक नियम लागू करण्याची सूचना; नव्या निर्बंधाबाबत केंद्र सरकारचे राज्यांना पत्र.

नवी दिल्ली दि.22 डिसेंबर – भारतात (India) वाढते ओमायक्रॉनचं संकट (Omicron Crisis) पाहता आता ओढवलं आहे. केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी (Night Curfew) कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
(Omecron crisis … instructions to enforce strict rules; Central Government’s letter to states regarding new restrictions.)
देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या (Omicron Cases) झपाट्याने वाढत आहेत. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) ओमायक्रॉनची 3 प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी (Night Curfew) कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना वॉर रूम सक्रिय करण्यास सांगण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी वैज्ञानिक अहवालांच्या आधारे राज्यांना सांगितले आहे, की ओमायक्रॉन हा जुन्या डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) पेक्षाही तीन पटीने वेगाने पसरत आहे. त्यामुळे याला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे केंद्राने म्हटले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, भारतातील अनेक भागात अजूनही डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर राज्य सरकारांनी दूरदृष्टी, डेटा विश्लेषणासह कठोर आणि त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.
पत्रात रात्रीचा कर्फ्यू आणि कडक नियम लागू करण्याची सूचना
केंद्र आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यावर देशातील कोरोना आणि ओमायक्रॉन परिस्थितीवर माहिती देण्यात आली आहे. तर काही राज्यात अद्याप ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे त्याला रोखण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना कराव्यात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. जर गरज पडण्यास रात्रीचा कर्फ्यू लावण्याची गर्दी न होण्यासाठी कडम नियम (restrictions) लागू करावे, मोठ्या मेळाव्यावर बंदी घालणे, लग्न आणि अंत्यविधींमध्ये लोकांची संख्या मर्यादित करणे यासारखी पावले उचलली जावीत, अशी सूचना देण्यात आली आहे.
केंद्र सचिवांनी आपल्या पत्रात जिल्हा स्तरावर कंटेनमेंट झोन (Containment zone) तयार करणे, कंटेनमेंट झोनची मर्यादा निश्चित करणे, प्रकरणांचा सातत्याने आढावा घेणे, रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवणे यासारखी आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने पत्रात म्हटलं आहे की, अशा धोरणामुळे संसर्ग उर्वरित राज्यात पसरण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर नियंत्रणात येईल.
आपल्या पत्रातून भूषण यांनी राज्यांना वॉर रूम, आपत्कालीन ऑपरेशन केंद्रे सक्रिय करण्यासही सांगितलं आहे. प्रकरणे कमी असली तरी जिल्हा आणि स्थानिक पातळीवर सक्रिय कारवाई करत रहा. क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा घ्या. या उपायांमुळे संसर्ग कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असंही ते म्हणाले.