धारुर तालुक्यात पुराच्या पाण्यात पिकअप वाहून गेले ; दोघांना वाचवण्यात यश, एकजण बेपत्ता.

किल्लेधारूर दि.15 अॉक्टोंबर – धारुर तालुक्यात पुराच्या पाण्यात पिकअप वाहून गेलल्याची घटना घडली. दिंद्रुड येथील तीन तरुण सिरसाळा -मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात पिकअप वाहनासह बुडाले, दोघा जणांना वाचवण्यात यश आले असून एक जण सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता होता. रईस अन्सर आत्तार बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी चार वाजे दरम्यान घडली. घटनास्थळी तहसीलदार दत्ता भारस्कर पथकासह पोहचले. बेपत्ता तरूणाचा शोध घेण्यासाठी पथक बोलवले असून अंधारा मुळे आज सकाळी शोध घेण्यात येणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर (flood) आला आहे. माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथील शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार, व दिपक चोरघडे हे तीन तरुण चार चाकी पिकअप घेऊन दिंद्रुडहुन आंबेजोगाईला (Ambajogai) जाण्यासाठी निघाले होते. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्यात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहन व तिन तरुण शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे शेख अखिल आत्तार व दिपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र शेख रईस अन्सर अत्तार (वय 35 वर्ष) वाहत्या पाण्यात बेपत्ता (missing) झाला आहे.
सतत कोसळत असलेला पाऊस (heavy rains) व पुराच्या पाण्याचा प्रवाहामुळे शोध कार्यास अडथळा येत आहे. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर मुंगी-सुकळी तलाव असून उद्या शनिवारी सकाळी आठ वाजेपासून परळी येथील फायर ब्रिगेडचे (fire brigade) शोध पथक सदर व्यक्तीचा शोध घेणार असल्याची माहिती धारूरचे (Dharur) तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिली. घटनास्थळी तहसीलदार दत्ता भारस्कर हे मंडळ अधिकारी सोपान वाघमारे व नजीर खुरेशी यांचेसह पोहचले होते. शोध मोहीमे साठी पथक पाचारण करण्यात आले आहे. स्थानिकांनी सायंकाळी सात वाजेपर्यंत केलेल्या शोध कार्यात सदर तरुण सापडला नाही.
( Pickup washed away in flood waters in Dharur taluka; Succeeded in saving two, one missing. )