एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय नवीन वर्षात; 48 हजार कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम.

मुंबई दि.22 डिसेंबर – एसटी महामंडळाचं (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करण्यात यावं, या मागणीसाठी दिड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून कर्मचारी संपावर (Strike) आहेत. या संपाबाबत आज उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी पार पडली.
(ST staff decision in new year; 48,000 employees insist on merger.)
या सुनावणीतूनही एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 5 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे. सुनावणीनंतर वकील गुणरत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. एसटी कर्मचारी (ST employees) हे मानसिक दबावाखाली आहेत. तसेच एकूण 48 हजार कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचंही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं.
न्यायालयात काय झालं?
आम्ही संपकरी नाहीत आम्ही दुखवट्यात आहोत. कर्मचारी आत्महत्या (suicide) करण्याच्या मार्गावर आहेत. मृत्यू नंतर दुखवटा होणे हे बरोबर आहे मात्र तो अनिश्चित काळाचा असतो यावर सदावर्ते यांनी युक्तिवाद करत 90 दिवसाचा असतो आणि आजच एकाचा मृत्यू झाला आहे यावर कोर्टाने अनिश्चित काळ असे नक्की केले.
न्यायमूर्ती प्रसन्न वराडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी झालेल्या युक्तीवादात महामंळाच्या वकिलांनी देखील भूमिका मांडली. या सुनावणीवेळी कोर्टात राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीचा प्राथमिक अहवालाचं वाचन करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. अखेर वेळेअभावी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 जानेवारीला होईल, असं कोर्टाने स्पष्ट केलं.