वाढदिवस विशेष…. अजातशत्रू; जयसिंग सोळंके…

जातीय आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणार्या प्रगल्भ विचाराच्या युवकांनी राजकारणात आले पाहिजे, असे सर्वांनाच वाटते. कारण अलीकडच्या काळात किळस वाटावी असे राजकारणाला स्वरूप आले आहे. घरात सरपंच, पोलिस पाटील असा छोटा वारसा असला तरी त्या कुटुंबातील मुले युवा नेता म्हणून तालुकाभर मिरवतात.
(Birthday Special …. Ajatashatru; Jaisingh Solanke …)
थोडा मोठा राजकीय वारसा असल्यास तर डोमडौल विचारायलाच नको. अशा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात येणार्या युवा नेत्याच्या जमान्यात विशाल राजकीय वारसा असलेला एक युवक अपवाद आहे. राजकारणातील चारित्र्यसंपन्न नेता असा ज्यांचा नेहमीच गौरव केला जातो त्या माजी उपमुख्यमंत्री स्व.सुंदरराव सोळंके साहेब आजोबा, चुलते प्रकाशदादा (Prakash Solanke) आमदार, वडील धैर्यशील काका जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे माजी पदाधिकारी व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन (chairman) एवढा मोठा राजकीय वारसा असतानाही जयसिंगभैय्या सोळंके (Jaising Solanke) यांना कसलाही गर्व नाही.
मोठेपणाचा बडेजाव नाही…
अनेक मोठे राजकीय घराणे पाहिले. त्या घरातील युवा नेते पाहिले पण जयसिंगभैय्या सोळंके यांच्या एवढा निर्मळ… नम्र, प्रगल्भ, तळागाळाती माणसांच्या प्रश्नांची जाण आणि पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करणारा एकही युवा नेता दिसला नाही.
शेती, माती आणि नाती जपणार्या धैर्यशिल काका यांच्या पावलावर पाऊल ठेवून जयसिंगभैय्या सोळंके हे समाजकारण करत आहेत… कोणाशीच वैर नाही… कोणाचा द्वेष नाही…
प्रश्न- अडचणी घेऊन येणारा समोरचा व्यक्ती कोण? त्याचा पक्ष कोणता? जात- धर्म काय? अशा फडतुस गोष्टींना किंमत न देता ते काम करतात… काम होत असेल तर स्वत:चे काम आहे, या पध्दतीने ते लोकांची कामे करतात… काम होणार नसेल… नियमात बसत नसेल… तर तसे स्पष्टपणे सांगतात…
यामुळेच जयसिंगभैय्या राजकारण नव्हे तर समाजकारण करतात असे वाटते… त्यांच्या या काम करण्याच्या पध्दतीमुळेच अवघ्या आठ- नऊ वर्षात पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती अशी मजल त्यांनी मारली आहे… आ. प्रकाशदादा यांनी वर्षभरापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही आपली शेवटची निवडणुक असल्याचे जाहिर करत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या जयसिंगभैय्या यांच्याकडे राजकीय सुत्रे देण्याचा निर्धार केला आहे…
यामुळे सोळंके घराण्याचा तिसऱ्या पिढीतील वारसदार आणि माजलगाव मतदार संघातील भावी आमदार म्हणून जयसिंगभैय्या सोळंके यांच्याकडे पाहीले जात आहे. हजारो तरूणांची फळी त्यांच्या पाठीशी उभी असून जेष्ठ, श्रेष्ठ अशा गावपातळीवरील कार्यकर्ते, नेते यांच्यापासून ते तालुका आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकार्यांमध्ये जयसिंगभैय्या यांची प्रचंड क्रेझ आहे. बदलत्या काळात अशाच प्रगल्भ विचाराच्या, नम्र, निर्मळ आणि निवडणुकीपुरते राजकारण करणार्या नेतृत्वाची या जिल्ह्याला गरज आहे.
आजोबा स्व. सुंदरराव साहेब, वडील धैर्यशिल काका यांच्या आदर्श विचाराची पताका खांद्यावर घेऊन काम करत असलेले हे युवकांचे लोभस नेतृत्व आगामी काळात राज्याचा नेता बनो… याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा….!
जयसिंगभैय्या यांना शुभेच्छा देताना एका कविच्या दोन ओळी आठवातात…
जब ईरादा बना लिया उची उडान का,
फिर देखना फिजूल है, कद आसमान का।
– विश्वास शिनगारे, सोशल मेडीया सेल, किल्लेधारूर.