अजित पवारांनी केले आवरगावचे कौतूक; सर्वोत्परी मदतीचे दिले आश्वासन.

किल्लेधारूर दि.3 सप्टेंबर – गुरूवार दि.2 सप्टेंबर रोजी सायंकाळी बीडचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) अजित पवार यांनी धारूर तालुक्यातील आवरगाव या स्मार्ट ग्रामला (Smart village) भेट दिली. यावेळी ग्राम पंचायतने केलेल्या कामाचे कौतूक करत पवार यांनी सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
(Ajit Pawar praises Awargaon; Assurance of the best help given.)
बीड (Beed) जिल्ह्यात बदली होवून नव्याने पदभार स्विकारलेल्या मुख्यकार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) अजित पवार (Ajit Pawar) यांनी धारुर (Dharur) तालुक्यात भेट दिली. यावेळी तालुक्यात आपल्या कामाची छाप टाकलेल्या व स्मार्ट ग्राम अशी ओळख निर्माण केलेल्या आवरगाव या गावाला त्यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer) दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती.
साधारणत: दोन तास ते आवरगावमध्ये होते. यावेळी त्यांनी चांगलं काम करणार्या आवरगावच्या सरपंच पद्मीनीबाई जगताप, युवा नेते अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, अंगणवाडीताई निता नखाते, आशाताई अंजली नखाते यांचे भरभरून कौतूक करत त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पवार यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. गावातील नियोजन पाहूण यावेळी ते अक्षरक्ष: भारावरून गेले.
ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अगदी त्याचप्रमाणे आवरगावही वाटचाल करत आहे, त्यामुळे भविष्यात आवरगाव महाराष्ट्रासाठी नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्वासही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. याबरोबरच यापुढे गावाला ज्या ज्या वेळी मदत लागेल त्या त्यावेळी आम्ही तात्काळ मदत करू, गावाला मिळालेला पुरस्कार आणि त्या पुरस्काराची रक्कमही तात्काळ मिळवून देवू , असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी आवरगावातील ज्येष्ठ नागरिक सर्जेराव जगताप, डिंगाबर नखाते, अजित जगताप, लालासाहेब जगताप, बालासाहेब नखाते, कुलदीप जगताप, पुष्पराज जगताप, महादेव जगताप, राहूल नखाते, राहूल जगताप, महेश नखाते, मनोज नखाते, विनोद नखाते, बळवंत नखाते, सुरेंद्र नखाते, उत्तम लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.