खासदार संजय राऊत यांचा भाजपा वर हल्लाबोल ; केंद्रीय तपास यंत्रणांची दादागिरी, काय म्हटले खा. राऊत…

मुंबई दि.15 फेब्रुवारी – भाजपचे ( BJP ) प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्ही सरकार पाडणारच आहोत. तुम्ही मध्ये पडू नका, असंही त्यांनी नेत्यांनी आपल्याला सांगितलं. तसेच तुम्ही मदत केली नाही, तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशी धमकी दिल्याचं राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

( MP Sanjay Raut’s assassination; Dadagiri of the Central Investigation Agency, see what is said. Raut … )

केंद्रीय तपास यंत्रणांमुळे त्रस्त झालेलं महाविकास आघाडी सरकार आगामी काळात राज्यातील भाजपला लक्ष्य करणार अशी शक्यता होती. विशेषत: शिवसेनेने तशी तयारी केल्याचं दिसून येत असून खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच सोमवारी भाजपला गर्भित इशारा दिला होता. त्यानुसार आज पत्रकार परिषदेत याची सुरुवात झाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत…
आमचे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री सर्वजण असतील. केंद्रीय तपास यंत्रणांची जी काही दादागिरी सुरू आहे. शिवसेनेवर ज्या पद्धतीने खोट्या आरोपांचा चिखल उडविण्यात येतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल. महाराष्ट्र ( Maharashtra ) भाजपमधील साडेतीन लोकांना कारागृहात पाठविण्याची तयारी सुरू केल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं होते.

त्यानुसार पहिला बॉम्ब पडला आहे. ते म्हणाले की, भाजपचे प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्हाला हे सरकार पाडायचं आहे. आमची तयारी झाली आहे. आम्ही सरकार पाडणारच आहोत. तुम्ही मध्ये पडू नका, असंही त्यांनी नेत्यांनी आपल्याला सांगितलं. तसेच तुम्ही मदत केली नाही, तर केंद्रीय यंत्रणा ( Central Investigation Agency ) तुम्हाला टाईट करतील, अशी धमकी दिल्याचं राऊत यांनी म्हटलं.

राऊत म्हणाले की, आपण शिवसेनेकडून आतापर्यंत उत्तर दिलं नव्हतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सुचना केली आधी जनतेसमोर जा. त्यामुळे सुरुवात शिवसेना भवनातून केली असून आम्ही अंत ईडीच्या (ED) कार्यालयातून करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

नील सोमय्या यांना ताबडतोब अटक करा…
पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट आणि नील सोमय्या यांना ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे, सगळे पेपर्स मी ईडीकडे तीन वेळा पाठवले. गेल्या तीन महिन्यात किमान तीन वेळा ईडी कार्यालयात पाठवले. तुम्ही एक दोन गुंठेवाल्यांना बोलावता. किरिट सोमय्या ( Kirit Somaiya ) ईडीच्या कार्यालयात बसून दही आणि खिचडी खात असल्याचं मी बघितलंय.

ईडी वालो सुनो…
राकेश वाधवान पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. बराच मोठा बिल्डर आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यावर 20 कोटी गेलेत, हे सर्वांना माहितीय. ईडी वाले सुनो, माझं बोलणं आज ऐकावं लागेल. ईडी आणि सीबीआय ( CBI ) पंतप्रधान आणि गृहमंत्री आज माझं बोलणं ऐकतायत हे मला माहितीय.

सोमय्या म्हणतात की राकेश वाधवान भयंकर माणूस आहे, घोटाळा केला म्हणतात. पण निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर ( Nikon Infrastructure ) कंपनी कुणाची आहे, ही कंपनी सोमय्यांची आणि त्यांच्या मुलांची आहे, तो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. पीएमसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन लाडानी याच्या नावावर घेतली. रोख रक्कमसुद्धा घेतली ही रक्कम 80 ते 100 कोटींच्या घरात आहे. जमिन लडानीच्या नावावर घेतलीय. वसईत 400 कोटी रुपयांची जमिन साडेचार कोटी रुपयांना घेतली…

पाच वर्षात दुधवाला, 7 हजार कोटीचा मालक कसा बनतो?
मला कुणीतरी म्हटलं की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचं बाकी राहिलंय. तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, 7 हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात येणं जाणं सुरु झालं. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणं जाणं सुरु होतं आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केलं मनी लाँड्रिंग, 7 हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली. महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला.

2024 नंतर काय करायचं बघू…
मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला हे लोक लागले. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले. किती पैसे दिले अशी विचारणा केली. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच केलं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला. त्यात कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय, मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय. जेलमध्ये टाकणार आहात, टाका… पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात.

पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं…
माझ्या आय़ुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही. 20 वर्षांचे स्टेटमेंट घेऊन गेले. ईडीचा तपास गंमतीचा आहे. माझं गाव अलिबाग, माझी जमिन अलिबागला असेल ना, मॉरिशिअसला ( Mauritius ) नसेल 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. 50 गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी तिथल्या गावात नातेवाईकांना पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं, संजय राऊतांच्या विरोधात लिहून दे, तुला किती कॅश दिली असं त्यांना धमकी दिली. गरीब लोक घाबरतायत ते, 12 – 14 तास त्यांना बेकायदा डांबून ठेवलं. कोणत्या कायद्याने कोणता तपास करताय. 50 गुंठे जमिनीचा तपास करताय? किती तपास पडलाय ईडीसमोर…

पत्रकारांची पिकनिक काढू…
त्यांनी जे आरोप केले आहेत, की आमचे 19 बंगले आहेत. आपण 4 गाड्या करून त्या 19 बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन , दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी, चला दाखवू त्यांना लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा. मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असूया, हायकोर्टात सोमय्यांनी मराठी भाषा मुंबईतून, शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी धाव घेतली होती. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, आणि मुंबईत मराठी कट्टा चालवतात..

शिवसेना ( Shiv Sena ) उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले सुरु आहेत. शिवसेनेनं आतापर्यंत उत्तर दिलं होतं. आधी लोकांसमोर वस्तुस्थिती येऊद्या असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ही पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो. पण सुरुवात इथून आणि अंत तिथे करु. महाराष्ट्रात येऊन आमच्या घरात घुसणार, आमच्या बायका मुलींकडे बघणार, भाजपवाले टाळ्या वाजवणार?

माझ्या मित्रांवर धाडी पडत होत्या. जे आरोप माझ्यावर झाले त्यातलं एकही प्रकऱण खरं नाही. मराठी माणसाने धंदा करू नये असं त्यांना वाटतं.खोट्या नावाने फोन करायचे, तुमच्याकडे ईडी, सीबीआय येतंय. तुमच्या वडिलांना अटक केली जाईल अशा धमक्या दिल्या जातात. भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केलाय.

मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेतो, राऊतांच्या घरी ईडीचे लोक पोहोचणार आहेत सांगितलं जातं, तुमच्या तपास यंत्रणांचा असा गैरवापर करून असा त्रास देता आणि तुम्हाला वाटतं की झुकू, बाळासाहेब ठाकरेंनी ( Balasaheb Thackeray ) आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही, तुम्ही काहीही करा सरकार पडणार नाही.

तुम्ही काही बोलू शकता असं मी त्यांना सांगितलं, पण ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. सध्या पवार कुटुंबाकडून धाडी पडतायत. तेसुद्धा प्रकरण सोपं नाही. त्यांनासुद्धा टाइट करणं सोपं नाही. शरद पवार यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर एक दिवसाने धाडी पडायला लागल्या. त्यांच्या नातेवाईकांच्या घरात धाडी टाकल्या. आठ आठ दिवस घरात जाऊन बसले. धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यांना मी सांगितलं की, तुम्ही भानगडीत पडू नका. यावर त्यांनी केंद्रीय पोलिस बल आणून तुम्हाला थंड करू असंही सांगण्यात आलं. तिसऱ्या दिवशी लगेच ईडीच्या धाडी माझ्या जवळच्या लोकांवर सुरु झाल्या. पहाटे तीन, चार वाजता धाड पडायला लागली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर…
अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचं संकट आहे. असंच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरुय. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे.

धमक्या दिल्या जातायत…
एक तर तुम्ही गुडघे टेका किंवा सरकार आम्ही घालवू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातायत. भाजपचे प्रमुख पक्ष रोज तारखा का देतायत. महाराष्ट्रात १७० चे् बहुमत असताना भाजपचे लोकं दोन दिवसांनी एक तारीख देतात. आता दहा मार्चनंतर बोलतायत. हे तुम्ही कोणाच्या भरोशावर देताय.

महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आपण शिवसेनेच्या वास्तूतुन फुंकतोय. बाळासाहेबांनी मंत्र दिला होता तो आयुष्यभरासाठी आहे. तु काही पाप केलं नसेल, गुन्हा केले नसेल तर तुमचं मन साफ आहे कुणाच्या बापाला घाबरू नका असं बाळासाहेब सांगायचे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा ( Uddhav Thackeray ) याच पद्धतीने पक्षाला पुढे घेऊन जातायेत. आम्हाला संदेश द्यायचाय की महाराष्ट्र गांडुची औलाद नाही, मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असल्याचं राऊत म्हणाले. शेवटी मोहित कंबोज हा माणूस फडणवीसांना बुडवणार असं वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!